(अ)सत्यवान व्यक्तीसाठी... २

हिंदीमध्ये एक वाक्प्रचार आहे, `गिरे तो गिरे फिर भी तंग ऊपर!' तात्पर्य काय? दांभिक व्यक्ती सदैव असा व्यवहार करते की, जणूकाही त्याने आपल्या विचाराने जग जिंकलं; परंतु दुसऱ्या बाजूला सर्व लोकांना माहित असते की तो अहंकारी दांभिक व्यक्ती हरलाय! 

अशीच पुन्हा आज तुझी अवस्था झालीय. भाषा शिकायला खूप वर्षाची तपश्चर्या करावी लागते. मी वापरलेली भाषा खालच्या थराची आणि तुझी भाषा अमृतपरी गोड? असं अहंकारी व्यक्तीला नेहमीच वाटते. तुझी खेटराने पूजा करायची लायकी असल्याने ती केली. म्हणे मी सत्य बोललो... अरे दुसऱ्यांना वाट्टेल तसे प्रश्न विचारणे सोपे असते. तू एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाहीस.. ही तुझी कुवत! त्यामुळे तू खुळावलास...  तुझा आवाज बंद करायला माझी गरज नाही. तू स्वतःच्याच (कु)कर्माने तुझा आवाज बंद करणार आहेस. जो आजपर्यंत बंदच होता. तुला चाळीस पैशाच्या ट्रोलरप्रमाणे माझ्याविरोधात कोणीतरी वापरून घेतले. हे आता सर्वांच्या लक्षात आले आहेच.

माझी भावनाच नव्हेतर तू कोणाचीच भावना समजू शकत नाहीस. तेवढी समज यायला तुला कित्येक वर्षे जातील. असलदे विकास मंडळाचा सेक्रेटरी म्हणून माझी नेमणूक मंडळाच्या सभेत झाली आहे. (विशेषतः  सन्मानिय विनय नरे, सन्मानिय मनोहर डामरे, सन्मानिय सुरेश डामरे, सन्मानिय बळीराम (आबा) परब, सन्मानिय अनिल तांबे अशा मान्यवर व्यक्तींना विचारून घे!) तत्पूर्वी मी सुमारे २५ वर्षे पत्रकार म्हणून काम करीत होतो. मी ज्या पदावर असतो, त्याचा मला स्वाभिमान असतो. अहंकार नाही. असलदे विकास मंडळाच्या सेक्रेटरी पदाचा त्याग मी कधीही करायला तयार आहे; पण तुझ्यासारख्या दांभिक लोकांच्या नादीला लागून नाही. अनिती, गैरव्यवहार, गैरकारभार, भ्रष्टाचार विरोधात मी सेक्रेटरी पदावर येण्यापूर्वीपासूनच लढतोय आणि त्या पदावरून बाजूला गेलो तरी लढत राहीन. हे समजून घ्यायलाही तारतम्यता लागते.      

जोडायला अक्कल लागते; तीही तुझ्याकडे नाही. मी आजपर्यंत माणसं तोडायची कामं केली. हो! अनिती, गैरव्यवहार, गैरकारभार, भ्र्रष्टाचार करणाऱ्या माणसांना मी तोडलच! माझे विचार फालतू म्हणतोस आणि तू स्वतःला ज्ञानवंत, प्रतिभावंत समजतोस काय? 

मी सांगितले म्हणून तू असा वागलास, असं तुझं म्हणणं! म्हणूनच मला खाण्याची भाषा वापरावी लागली व ती तुला लगेच समजली. तू आजपर्यंत तेच खाल्लंस म्हणून तुझ्या बुद्धीचा विकास तसाच झाला. तू सत्य वचनी आहे की असत्य वचनी; हे सर्वांना आता चांगलेच कळून चुकले. खरं तर तुझ्यासारख्या बेअक्कल माणसाला शिकविण्यासाठी मी चांगली भाषा वापरत होतो. पण तुला ती समजून येतच नव्हती. म्हणून हे सगळं लिखाण करून तुझं पितळ उघड करावं लागलं.

ग्रुपमधील सर्वांनी तुला समजून सांगितले. तुला सन्मानिय अध्यक्ष सुरेश डामरे यांनी स्पष्ट शब्दात फोनवरून काही गोष्टी सांगितल्या. मी केलेला फोन तू उचलला नाहीस. एवढं करूनही तुझी अक्कल ठिकाणावर येत नव्हती. म्हणून हे सगळं लिहावं लागलं. 

असलदे गावाचे सर्वच आजी- माजी सरपंच यांच्याशी माझे वैयक्तिक वैर नव्हते, नाही आणि नसेल. पण तुझ्यामुळे मला जुन्या गोष्टी बाहेर काढाव्या लागल्या. त्यावर तुझी बोलती बंद झाली; हे मान्य कर! 

तू जे काही अकलेचे तारे तोडलेस; त्यातून असलदे विकास मंडळावरील आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधी असलेला द्वेष, संताप प्रकट झाला. असो! मीही मतिमंद असलेल्या तुझ्यासारख्या लोकांना बांधील नाही. तूर्तास थांबतो.

Comments