(अ)सत्यवान व्यक्तीसाठी...

(अ)सत्यवान आधी वाच...  समजून घे... अज्ञान दूर कर... नाहीतर पुन्हा ७ - ८ वर्षांनी प्रश्न विचारशील...      

मोबाईल टॉवर मानवी वस्तीमध्ये - शाळेच्या बाजूला का असू नये? शासनाचे नियम अटी शर्ती कोणत्या? 

(पुढील लिंकवर क्लिक करून अभ्यास कर.)  

https://www.commonfloor.com/guide/guidelines-for-installation-of-the-mobile-towers-4485.html

https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/bmc-wants-no-cell-towers-on-schools-hospitals-orphanages/articleshow/20980266.cms

https://nwcmc.gov.in/web/upload_files/menu_image/headerimage/Mobile%20Tower%20Notification.pdf

https://diehardindian.com/download/DC-rules.pdf

https://www.mondaq.com/india/telecoms-mobile--cable-communications/593594/law-regulating-the-environmental-impact-of-mobile-towers-in-india

https://diehardindian.com/download/DC-rules.pdf.

केंद्र सरकारचे सर्व नियम मोडून असलदे शिवाजी नगरात कोणी टॉवर उभा केला? (अ)सत्यवान उत्तर दे. कारण तू सुपारी घेतली आहेस ना...! 

----------

असलदे गावात २०१२ ते २०२२ दरम्यान अज्ञात मृतदेह का आढळत होते? अभिमन्यु लोके याचे प्रेत किती दिवसांनी आढळले? ह्याची उत्तरं कोण देणार?

असलदे गावात मृत्यू झालेल्या माणसाला जिवंत करून त्याच्या खरेदीखतावर सह्या कशा झाल्या? त्यावर लेख लिहिला तर तुरुंगात जाल. मला उलट `तुझं आम्ही बाहेर काढू' म्हणून धमक्या देता? तुम्ही फक्त खोटे आरोप करू शकता. बदनामी करू शकता. 

संतोष तावडे ह्या युवकाचा संशयित मृत्यू झाला. तेव्हा वर्तमानपत्रात ताकदीने बातम्या प्रसिद्ध करणारा नरेंद्रच होता! तुझ्यासारख्या माणसांचे ते काम नाही. तू रोखठोक कधीपासून बोलायला लागलास? तुला हे प्रश्न आजच का पडायला लागले? कारण असलदे गावाचे सन्मानिय सरपंच भारतीय जनता पार्टीत जाताच तुला सुपारी देणाऱ्यांची अवस्था बिकट झाली आणि भविष्यात होणार! हे तू आणि तुझ्या नेत्याने चांगले जाणले म्हणून हा तुझा फाफटपसारा आणि आदळआपट! 

असलदे विकास मंडळ बंद पडावे म्हणून तू वाईट कृत्य करीत होतास आणि आहेस. 

प्राथमिक शाळा नं- १ च्या संदर्भात ``आम्ही मंडळाला माफी मागायला लावली'' असा गर्वाने उल्लेख केला आहेस. हा विषय तेव्हाच संपला होता. (मंडळाचा सेक्रेटरी नरेंद्र हडकर नव्हता.) तू ज्या मंडळात आहेस त्या मंडळाने माफी मागितली ह्याचा तुला अभिमान वाटतो आणि त्यावेळी संपलेला विषय काढून तू गावात आपआपसातील वैरभावना कशी वाढेल? हे पाहतोस. मंडळाने माफी मागितली ह्याचा तुला अभिमान वाटतो, ह्याचा अर्थ तू मंडळाचा हितचिंतक नाहीस तर मंडळाच्या मुळावर येणारा आहेस. एवढे प्रश्न विचारताना मंडळाने विकासाचे केलेले एकही काम तुला आठवत नाही. ह्याचा अर्थ काय? तू मंडळाचा विरोधक आहेस. मनुष्य बाहेरून काळा असला तरी आतून काळा असता कामा नये. हे लक्षात ठेव.     

असलदे गावात मुंबई गोवा महामार्गावर पेट्रोल पंप झाला! ती जमीनच नव्हे तर अशा अनेक जमीनी गेल्या २०१२ ते २०२२ दरम्यान गावाबाहेरच्या लोकांना विकताना सर्वाधिक दलाली कोणी केली? सरपंच - उपसरपंच पदावर कोण होतं? तेव्हा बोलायची हिम्मत ठेवली असती तर?

तुझ्यासारखी विद्वेषी माणसं मंडळात असलीतर मंडळाचे कार्य होणारच कसं? मंडळ बंद व्हावे म्हणून तू केलेली कृत्य मला माहिती नाही, असं तुला वाटतं का?

नरेंद्र हडकरला सरपंच पदासाठी मधलीवाडीच्या मुंबई मंडळाने शिफारस केली होती. त्याला असलदे विकास मंडळाने पाठींबा जाहीर केला. मी का व कशासाठी निवडणूक लढविली? हे सगळ्यांना माहित आहे. पण तुझ्यासारख्या कपट लोकांनी तेव्हा शांत राहून कारस्थानं केली. ते तुझ्या आताच्या भूमिकेमुळे उघड झाले. नाहीतर काहीच न बोलणारा तू खुळा, भोळसट वाटायचा. असो! सन्मानिय चंद्रकांत डामरे यांनी पक्षांतर केले. नाहीतर तुझ्या अंतर्मनातील गटार दिसले नसते. तुला वाटत असेल की नरेंद्र बरोबर अरेरावी केली की तुझा उदोउदो होईल? हा तुझा भ्रम आहे. असलदे गावाच्या स्वाभिमानासाठी, मंडळावर खोटा आरोप करणाऱ्या आणि भ्रष्ट कारभार करणाऱ्या वृत्ती विरोधात मी सरपंच पदाची निवडणूक लढविली. स्वतःच्या स्वार्थासाठी लढविली असती तर गेल्या ३२ वर्षात पक्षीय राजकारण करून राजकारणात पदं घेतली असती. हे लक्षात ठेव.     

नरेंद्र हडकरची बरोबरी तू कधीच करू शकणार नाहीस. ही `जलण' तुझ्यात असल्याने तू असा असंबंध बोलत आहेस. तुला चांगलेच माहित आहे की, नरेंद्र ज्या भावकीत, वाडीत, गावात, संस्थेत काम करतो त्याबद्दल अभिमान बाळगून असतो आणि सगळ्या प्रश्नांना उचित उत्तरं देतो. त्यामुळे असलदे विकास मंडळातून नरेंद्र बाहेर पडला की पुन्हा बजबजपुरी माजविता येईल. हे तुझे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. मी असलदे विकास मंडळाच्या पदावर असेन किंवा नसेन; पण मंडळाच्याच बाजूने असेन. कोणतीही पदं कायम स्वरूपी राहत नसतात. पण आयुष्यात प्रामाणिक केलेले काम तुमची लायकी ठरविते. माझ्याबद्दल, असलदे विकास मंडळाबद्दल विष पेरल्याबद्दल तुला आज ना उद्या उत्तरं द्यायचीच आहेत.

कोरोना महामारीच्या काळात असलदे ग्रामपंचायत कशी वागली? हे सगळ्या मुंबईकरांना माहित नाही काय? त्यामुळे अनेकांना आपल्या आई- वडिलांचे अंतिम दर्शनही घेता आले नाही. ह्याची उत्तरं देशील काय?        

मी गावाकडे पद मागितले नाही तर ते मला सन्मानाने दिले गेले. हेही लक्षात ठेव!

Comments